शनिवार, १४ मे, २०११

वाहतुक नियंत्रण पोलिस

काल संध्याकाळी काही कामा निमीत्त इर्ला (विले पार्ले)ला गेले होते , काम उरकताच ट्रेन पकडण्यासाठी धावपळ करत निघाले. अंधेरी स्थानकासाठी रीक्षा मीळण्याचा चान्सच नाही तिथुन पण तरी प्रत्तेक रीक्षेला हात दाखवतच होते. एकाने रीक्षा थांबाऊन विचाराले, "अंधेरी स्टेशन" तर उद्दटा सारखा चेहरा करुन मझ्यावराच वैताकला आणी निघुन गेला. मला हे अपेक्षीताच होते की असेच काही तरी होणार म्हणुन मी काहि लक्ष दिले नाही. तेवढ्यात त्या रिक्ष्याच्या मागच्या बाजुला उजव्या लेन मधुन कोणी तरी ओरडाले "काय हो तो नाही बोलला का? " वर पाहीले वाहतुक नियंत्रण पोलिसंची गाडी होती.

मी खुणेनीच "नाही बोलला तो"असे सांगीताले आणी त्यागडी चालकाने ग़ाडीचा वेग वढाऊन ज्यानीं मला विचारले होते त्यानिं त्या रीक्ष्यावर जोर जोरत हाताने २-३ थाप मारले आणी त्या चालकाने त्या रीक्ष्या समोर त्यांची गाडी आडवि घतलि त्या रिक्ष्यावाल्याला चार गोष्टि सुनावल्या . तो पर्यंत मी मागुन धावत येऊन त्या रिक्ष्यात बसले . आणी त्या वाहतुक नियंत्रकाना धन्यवाद देउन निघाले. स्टेशन वर पोचे पर्यंत १८ रु मिटर झाले होते माझ्या कडे ८रु सुट्टे नसल्याने मी २० रु दिले त्याने १५ रु घेताले आणी पैसे देता देता बोलला "अभी छुट्टे के लीये मच मच किय तो और एखाद पुलीस वाला देखेगा बीना भाडा लिये भागना पडेगा"