सोमवार, २३ ऑगस्ट, २०१०

रक्षाबंधन


२००८ च्या रक्षाबंधनाच्यावेळी मी लेह-लडाख-कारगिल येथे "सलाम सैनिक " या मोहिमेत होते.तसे मी बरीच वर्ष झाले कोणालाच राखी बांधत नव्हते अगदी सख्या भावाला सुद्धा नाही.पण २००८ चे रक्षाबंधन माझ्या साठी खऱ्या अर्थाने रक्षाबंधनच होते."मी लहान असताना मला कोण्या मोठ्या काढून सांगण्यात आले होते की रक्षाबंधन म्हणजे आपल्या भावाने आपले रक्षण करणे असते आणी त्या साठी आपण राखीपौर्णिमेच्या दिवशी आपल्या भावाला राखी बांधतो."
पण माझा भाऊ माझ्या पेक्ष्या ९ वर्षाने लहान असल्याने त्याचेच रक्षण आम्हा बहिणींना करावे लागते आणी त्या वर्षी पसून मी राखी कोणाला बांधली नव्हती, उलट नंतर नंतर असे झाले की माझ्या काही मैत्रिणी मला राखी बंधू लागल्या की ही आमची नेहमीच काळजी घेत असते,आणी काही आर्थी हीच आमचे रक्षण करते म्हणुन त्या मला राखी बांधत असत.
पण जेव्हा मी २००८ ला आपल्या लेह-लडाख-कारगिल येथे आपल्या जवानांना(सैनिक)आपल्या देशाचे रक्षण करताना पहिले तेव्हा मात्र मला त्यांना खऱ्या अर्थाने राखी बांधावीशी वाटली.आणी या रक्षाबंधनाच्या वेळी काही सैनिकान सोबत झालेले संवाद अजून जसेच्या तसे हृदयात साठवलेले आहेत .










ई एम ई वर्क शॉप-द्रास

एक सैनिक(मराठी-कोल्हापूरचे)

"इथे आज पर्यंत बरेच पर्यटक येऊन जातात काही मदत लागली की त्यांना आमची आठवण येत,पण असे आम्ही पहिल्यांदाच पाहतोय की कोणी खास इतक्या लांबून सैनिकांना खास सलाम करण्यासाठी आला आहात आणी त्या साठी तुम्ही तुमच्या मोहिमेच नाव पण "सलाम सैनिक" ठेवले आहे.
आणी न विसरता तुम्ही इथील हजारो सैनिकान साठी हजारो राख्या पण घेऊन आला आहात.





एक सैनिक(ओरिसा)
"अरे हमारी बहेन भी हर साल राखी भेजती है पण एक भी साल हमे वो राखी वक्त पर नाही मीली पण हमारी ये बहेने आज के दीन आपने सगे भाईयो को छोडके हमे राखी बांध राही है इससे और अछा खुशीका मोका नाही हो सकता "





आणी हे सगळे चालू असतानाच माझे अचनक लक्ष्य थोड्या दूर वर एका जीप पाशी गेले आणी त्या जीप च्या पलीकडे मला कोणी तरी बसलेले दिसले म्हणुन मी आणी माझ्या सोबत सत्तेन तिथे गेलो आणी तिथे दोन सैनिक बसलेले दिसले आणी मी तिथे पोचताच त्या सैनिकाने आपले तोंड त्याच्या ओंजळीने झाकून घेतले,खूपदा विचारले काय झाले?आमचे काही चुकले का?की अजून काही झाले?आणी बऱ्याच वेळाने त्यांनी त्यांच्या बहिणीची व्यथा सांगायला सुरवत केली.आणी शेवटी असे काळाले की काही दिवसान पूर्वीच त्याची बहिण वारली होती आणी त्यांना सैनिकांचा असा रडणारा चेहरा आम्हाला दाखवायचा न्हवता म्हणुन ते असे लपून बसले होते.
मी ही जास्त काही न बोलता त्यांना राखी बांधली आणी गोड त्याच्या हातात ठेऊन मी पुन्हा सगळ्यां सोबत येऊन थांबले .





आम्ही १५ ऑगस्ट पासूनच रक्ष्याबंधनाला सुरवात केली होती कारण एकदा का एखादा सैनिकांचा पोस्ट निघुन गेला की आम्हीला प्रत ते भेटणार नव्हते,असे आमी सतत ३ दिवस रक्ष्याबंधन केले.खूप ठिकाणच्या खूप सैनिकांच्या खूप आठवणी आमच्या सोबत होत्या .
आणी या जन्मातले खऱ्या अर्थेने झालेले हे रक्षाबंधन होते .

१३ टिप्पण्या:

  1. सलाम डोळ्यात तेल घालुन सदैव आपल रक्षण करणार्या त्या सैनिंकांना...आणि असा कौतुकास्पद उपक्रम राबवल्याबद्दल तुम्हालाही सलाम...

    उत्तर द्याहटवा
  2. आपले सैनिक खरोखरच भावासारखं आपलं रक्षण करतात. त्यांना सलाम आणि तुलाही!

    उत्तर द्याहटवा
  3. अनुजा...खुप स्तुत्य उपक्रम....सलाम!!

    उत्तर द्याहटवा
  4. मस्तच अनुजा... अर्थात हे फोटो आधी पाहिलेले असले तरी आज खास आवडले .. :)

    उत्तर द्याहटवा
  5. अरे होय रे!
    अगदी घाई घाईत लिहिले रे कारण आजचा दिवस तितकाच महत्वाचा वाटला हे सगळ्यान पुढे मांडायला म्हणुन .

    उत्तर द्याहटवा
  6. अरे वा
    जवानांना राखी बांधण्याचा अनुभव फारच छान असेल न..

    उत्तर द्याहटवा
  7. सॉलिड ग अनुजा !!! खूप उत्तम उपक्रम.. अभिनंदन !!!

    उत्तर द्याहटवा